Monday, January 9, 2023

बालसंगोपन






बाळाचा जन्म ही आनंदाची घटना असली तरी बहुतेक वेळेला नवोदीत मातापिता गोंधळलेले असतात. घरातल्या मोठया स्त्रीयांच्या सांगण्यानुसार त्यांचे बालसंगोपन चालू असते. परंतु आताची विभक्त कुटूंब पध्दती पाहाता प्रत्येक पालकाने स्वतः संगोपनाविषयी माहिती मिळवणे आवश्यक आहे.

बाळ रडत असलं की घरातली सगळी मंडळी घाबरुन जातात. बाळाच रडणं हे त्याच्या संवादाच माध्यम आहे. त्याला कदाचित भूक लागली असल्यास, झोप आली असल्यास, उकडत किंवा थंडी वाजत असल्यास, पोटात दुखत (कॉलिक पेन्स) असल्यास.. ह्यापैकी कुठल्याही कारणांसाठी रडतात. बरेचवेळा ही लहान बाळं संध्याकाळच्या वेळेला टीपेचा सूर लावतात. सवयीने पालकांना बाळाच्या रडण्यातला फरक लक्षात येतो. बाळांच हे रडणं समजावून घेतल्यास त्याला शांत करणं सोप जात .

नवजात बालकाच्या जन्मापासून ते तीन महिन्यांपर्यंत बाळाच्या बरयाचश्या हालचाली ह्या ‘रिफ्लेक्सईव्ह’ असतात. परंतु बाळ साधारण तीन महिन्याचे झाले की त्याची समज अधिक वाढलेली असते. त्याच्या हनुवटीवर बोट ठेवल्यास, स्तनाचा वास किंवा स्पर्श झाल्यास बाळ आपोआप मान त्या दिशेने वळवते. वातावरणातला फरकही बाळाला कळतो. कपडे किंवा दुपटी बदलतांना आपले हातपाय लांब करुन बाळ ते जाहीर करत असते. 

 

बाळ साधारणतः पाचव्या सहाव्या महिन्यात बसायला सुरुवात करते. त्या अगोदर त्याला जबरदस्तीने बसविण्याचा प्रयत्न करू नये. आपण होऊनही बसायला लागल्यावर सुरुवातीला त्याला फार वेळ बसू देऊ नये. कारण त्यामुळे बाळाच्या पाठीला पोक येऊ शकते. किंवा त्याच्या पाठीचा कणा कमकुवत राहू शकतो. हीच काळजी बाळ उभे राहू लागता घ्यावी. जबरदस्तीने हाताला धरून उभे केल्याने किंवा वॉकरमध्ये ठेवून चालवल्याने पाय वाकू शकतात व मुले थकूही शकतात. मुलांच्या शारीरिक विकासाचा एक नैसर्गिक क्रम ठरलेला असतो. त्याप्रमाणे बाळाला सर्व क्रिया स्वतःच्या स्वतः ठरलेल्या क्रमाने व ठरलेल्या वेळीच करू द्यावेत. दहा महिन्याचा झाला तरी आपले बाळ अजून चालत कसे नाही अशी अकारण काळजी करून त्याला हात धरून चालविण्याची किंवा वॉकर देण्याची गरज नसते.

 

 मुलांना पाण्याऐवजी खाली जमिनीवर गादी घालून ठेवणे व झोपविणे चांगले कारण त्यामुळे बाळाला चौफेर बघता येते व हालचालही करायला पुरेसा वाव मिळतो. बाळ स्वतःचे स्वतः पालथे पडायला लागले की पाळण्यातून, पलंगावरून खाली पडण्याची भीती असल्याने बाळाला जमिनीवरच झोपवावे. 

 

अगदी तान्हया बाळासाठी पाळणा वापरतांना पाळण्यावर बाळाच्या अगदी डोक्यावर गरगर फिरणारे झुंबर किंवा तत्सम भडक व कर्कश आणि मोठा आवाज करणारी खेळणी लटकवू नयेत. अशी डोक्यावर गरगर फिरणारी खेळणी बघून बाळ रडायचे थांबले तरी ते बहुधा भांबावून गेलेले असते. शिवाय अशा खेळण्यामुळे बाळाच्या डोळ्यावरही दुष्परिणाम होऊ शकतो.

 

लहान बाळाशी अगदी सुरुवातीपासून काही ना काही बोलत राहावे. इतक्या लहान बाळाला काय समजणार असा विचारही मनात आणू नये. आणि मुख्य म्हणजे बोलणे स्पष्ट, शुद्ध, अर्थपूर्ण, व सुसंबध्द असावे. लहान मुलांच्या आसपास भांडणे, तावातावाने बोलणे, रागावणे, आदळआपट करणे, टाळावे. अगदी लहान मुलांनाही घरात काय चालले आहे घरातील माणसे एकमेकांशी काय बोलत आहेत हे कळत असते. म्हणून लहान मुले असणाऱ्या घरातल्या माणसांनी फक्त मुलाशीच नव्हे तर आपापसात बोलतांनाही काळजीपूर्वक बोलावे. कोणताही अपशब्द किंवा कोणाबद्दल वाईट साईट बोलू नये. काळे-गोरे, श्रीमंत गरीब सुंदर कुरूप अशा प्रकारच्या तुलना किंवा भेदभाव मुलांसमोर न करणेच चांगले.

 

बाळ बसू लागले की त्याला शी-शू नियमित वेळेला करण्याच्या दृष्टीने सवय लावण्याचा प्रयत्न करावा. सकाळी उठल्यावर शी-शू होण्यासाठी बसवावे, रात्री झोपण्यापूर्वी शू करण्याची सवय लावावी. एरवीही साधारण वेळेचा अंदाज घेऊन शू करण्यास सांगावे. या प्रकारे सुरवातीपासून सवय लावल्यास या क्रियांमध्ये नियमितता येते.

 

वास्तविक दोन वर्षापर्यंतच्या मुलांना उपजत भितीची भावना नसते. त्यामुळे या वयात भीती दाखविल्यास मनावर भीतीचा पगडा बसून नंतरही भीती कायम घर करून राहते. भीती ही नैसर्गिक भावना असल्याने स्वभावानुसार थोड्या फार प्रमाणात येतेच फक्त त्यात आपल्या वागणुकीने भर टाकली जाणार नाही याकडे लक्ष ठेवावे. विशेषतः जरा समज आलेल्या मुलांना चुकूनही कसली भीती दाखवू नये. जसजसे मूल मोठे होईल तसतसे त्याच्या मानसिक विकासाला पूरक ठरतील. कल्पकतेला वाव देतील अशी खेळणी खेळायला द्यावीत. मुलाच्या नाकातोंडात जाऊ शकतील किंवा घशात जाऊन अडकू शकतील अशी आकाराची नसावीत. उदा. नाणी, गोट्यांसारख्या लहान लहान गोष्टींशी अगदी लहान मुलांना खेळू देऊ नये.

 

 मुलं तीन वर्षाचे होईपर्यंत साधारण ११-१२ तास झोपणे आवश्यक असते. अगदी लहान बाळ झोप आली की झोपून जाते. मात्र साधारण वर्षा दीड वर्षापेक्षा मोठ्या मुलाला रात्री वेळेवर म्हणजे साधारण आठ साडेआठच्या सुमाराला झोपवायला हवे. रात्री मुलांना बाहेर निल्याने किंवा घरात टीव्ही गप्पा वगैरे सुरू असतील तर जरा समज आलेल्या मुलांना झोपायची इच्छा होत नाही. याकरिता आई-वडिलांनी व घरातल्या इतर व्यक्तींनी स्वतःच्या दिनक्रमात बदल करावा, पण मुलांना वेळेवर झोपवावे. तीन चार वर्षापर्यंत मुलांनी दुपारी थोडावेळ झोपणेही चांगले असते. पुरेशा झोपेमुळे मेंदूला आवश्यक तेवढी विश्रांती मिळून मेंदूचा सर्वांगीण विकास व्हायला मदत मिळते.

 कोणतीही गोष्ट मिळाली की त्याचा आनंद सगळ्यांनाच होतो पण इतरांना काही देण्यातही आनंद असतो हे मुलांना दाखवून द्यावे. उदा. घरात चार पाच मुले जमली तर मुलाच्या हातून प्रत्येकाच्या हातावर थोडासा खाऊ देणे किंवा वाढदिवसाच्या दिवशी शाळेतल्या शेजार पाजारच्या मुलांना छोटीशी भेट देणे अशी छोट्या छोट्या गोष्टीतून लहान मुलांना शेअरिंगची सवय लावावी.

 

 मुलांना हॅरी पॉटर, पोकेमोन वगैरे हिंसक काल्पनिक गोष्टी दाखविण्यापेक्षा किंवा हिंसक वृत्ती वाढविणाऱ्या व्हिडिओ गेम्सची सवय लावण्यापेक्षा प्रबोधन करणाऱ्या पंचतंत्र, राम ,कृष्ण, हनुमान सारख्या पुराणकथा, परी कथा सांगाव्यात व दाखवाव्यात. एकसारखा टीव्ही बघितल्याने डोळ्यांवर परिणाम होतो हे तर सर्वज्ञात आहेच शिवाय एक सारखे बसून राहण्याची सवय लागल्याने मुल आळशी होण्याची शक्यताही वाढते.



जन्मपूर्व अवस्थेत शिक्षण का

  






माणसाच्या
जीवनाची सुरवात तो या जगात प्रत्यक्ष जन्माला येतो त्या क्षणापासून धरली जाते. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. जीवनाची सुरुवात जन्म होतो त्या क्षणाला त्या वेळेला होत नसून गर्भधारणेच्या क्षणाला होत असते.

       शुक्राणू स्त्रीबीज यांचे मिलन होऊन फलित झालेली पेशी (एम्ब्रियो) आणि अन्य सामान्य पेशी यांच्यात खूप फरक असतो. एम्ब्रियोमध्ये स्वतःला वाढविण्याची क्षमता असते, स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता असते, थोडक्यात त्याला "जाणीव" असते आणि तो "बुद्धिमान" ही असतो. इतर पेशी पेक्षा एम्ब्रियोला ही विलक्षण क्षमता कशामुळे प्राप्त होते? तर त्यामध्ये जीवन जगण्यासाठीची "जाणीव" निर्माण झालेली असते किंवा त्यात जीव-शक्ती किंवा प्राण-शक्तीची धारणा झालेली असते. हया जाणीवेमुळेच एम्ब्रियोमध्ये प्रथम पासूनच शिकण्याची क्षमता निर्माण झालेली असतेे.

       गर्भामध्ये मुल असताना त्याची नाळ आईशी जोडलेली असते. त्यामुळे आईकडून त्याला रासायनिक संदेश मिळत असतात. या संदेशाप्रमाणे ते मूल आपले मत ठरवत असते.


        मेंदू हा संपूर्ण आयुष्यभर, अनुभवांना संवेदनशील असतो. परंतू मेंदूची सर्वात वेगाने जडणघडण होणाऱ्या जन्मपूर्व अवस्थेत जन्मानंतर लगेच मेंदू सर्वाधिकसंवेदनशील असतो. मेंदूमधील पेशींना 'चेतापेशी' किंवा 'न्यूरॉन' असे संबोधतात. गर्भधारणेनंतर अवघ्या चौदाव्या दिवशी पहिला न्यूरॉन तयार होतो त्यानंतर दर मिनीटाला अडीच लाख न्यूरॉन्स या प्रचंड गतीने न्यूरॉन्स‍‌‌च्या निर्मितीचा कारखानाच सुरु होतो. आयुष्यामध्ये लागणाऱ्या एकूण मेंदूपेशी पैकी सुमारे 60% पेक्षा जास्त मेंदूपेशी या गर्भावस्थेमध्ये तयार होतात. मेंदूपेशी तयार झाल्या की त्यांना येत असलेला अनुभव साठवण्यासाठी त्यांची एक प्रकारची जोडणी सुरू होते. ही जोडणी पक्की असेल तर अनुभव चांगल्या तऱ्हेने लक्षात राहण्याची क्रिया होते. म्हणून आपले मूल बुद्धिमान, तेजस्वी होण्यासाठी, मेंदूपेशींची ही जोडणी सक्षम, बळकट होणे आवश्यक असते.

आईच्या पोटामध्ये गर्भ वाढत असल्यामुळे तिच्या आचार-विचारांचा, आहार-विहारांचा समजुतीचा आणि स्वभावाचा सुद्धा परिणाम गर्भावर होत असतो. बाहेरचे जग तो स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकत नाही. त्यामुळे त्याला आईकडून येणाऱ्या संदेशावर सर्वस्वी अवलंबून रहावे लागते. हे संदेश 'हार्मोन्स'च्या स्वरूपात असतात (केमिकल सिग्नल्स असतात). म्हणून आईला बाह्य जग कसे वाटते हे महत्त्वाचे असते. ते जग आनंदी आहे का कंटाळवाणे आहे, ते सुष्ट आहे की दृष्ट आहे हे तिला जसे वाटत असते तसे ते अप्रत्यक्षरित्या गर्भापर्यंत पोहोचत असते. हा जो अनुभव गर्भाला आईमार्फत मिळतो त्याप्रमाणे तो स्वतःत बदल करत असतो.

या पार्श्वभूमीवर, आईचे व्यक्तिमत्व जर अवाजवी ताण घेणारे असेल, जास्त संवेदनशील असेल, असमाधानी असेल तर त्याची झळ पोटात वाढणाऱ्या गर्भापर्यंत निश्चित पोहोचते. ताणाचे कारण काही जरी असले तरी त्याचा त्रास गर्भाला होतो, कारण आईच्या ताणामुळे गर्भामधील न्यूरॉन्सची जोडणी नीट होत नाही.


आईच्या मनामधील ताणाप्रमाणेच गर्भाच्या वाढीशी निगडीत दुसरा मुद्दा म्हणजे तिच्या मनात असलेली 'भिती' विशेषतः पहिले बाळंतपण असेल तर अनाकलनीय भिती वाटते. अनेकवेळा कानावर येणाऱ्या बातम्यांमुळे "माझे काय होईल?" ही शंका आणि त्याला जोडलेली भिती मनात घर करून राहते. काही वेळेला काही मातांचा स्वभावसुद्धा अवाजवी काळजी करणारा, मनात एरवी येणारे विचार नेमके या काळात आणणारा असा असतो. या सर्वांचा परिणाम पोटातल्या मुलाच्या वाढीवर होतो.

   पेशी विज्ञानाप्रमाणे प्रेमळ वातावरणात पेशींची वाढ उत्तम होते. त्यामुळे आईच्या मनात येणाऱ्या बाळाविषयी प्रेम असेल, आपुलकी असेल तर त्या वाढणाऱ्या पेशीभोवती म्हणजेच गर्भाभोवती तसे वातावरण निर्माण होते त्याची वाढ चांगली होते. याउलट आजूबाजूचे वातावरण भितीदायक असेल, किंवा आईच्या मनातील भितीमुळे तसे ते होत असेल तर मात्र ती पेशी त्या भितीपासून, संकटापासून स्वतःचे संरक्षण करण्यास प्राधान्य देते. त्यामुळे त्या पेशींची वाढ खुंटते या सर्वांचा परिणाम डिलेव्हरीनंतर बाळाच्या वजनामध्ये दिसतो. भित्र्या आईच्या छायेखाली गर्भात वाढणारी मुले ही पूर्ण दिवसांची असून सुद्धा वजनाला कमी भरतात. तर योग्य विचारांच्या समतोल मातेची मुले, धैर्य बाळगणाऱ्या मातेची मुले, अपेक्षित वजन असलेली किंबहुना थोडे जास्तच वजन असलेली निपजतात. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची, हसत खेळत राहणारी, कोणाचाही मत्सर करता निर्व्याज प्रेम करणारी माता, निश्चितच निरोगी, तेजस्वी आणि बुद्धिमान अपत्याला जन्म देईल. यावरून गरोदरपणातील आईची मानसिक स्थिती योग्य असणे किती महत्त्वाचे असते हे लक्षात येईल.


       गर्भ आईच्या पोटात वाढत असल्यामुळे आईच्या आहार विहाराचा परिणाम त्या गर्भावर होत असतो हे आपण तर्काने समजू शकतो. पण आताचे संशोधन असे सांगते की, ज्याप्रमाणे आईच्या भावना मुलापर्यंत पोहोचतात, तशाच पोटामधल्या बाळाच्या भावनांचाही परिणाम आईवर होत असतो. रासायनिक प्रक्रियेमार्फत ही देवाणघेवाण दोघांकडूनही चालू असते.

याला पुरक अशी एक रूढी आपल्याकडे प्रचलित आहे ती म्हणजे 'डोहाळे पुरविण्याची' .डोहाळे म्हणजे स्त्रीची इच्छा नाही, तर ती दोन जीवांची इच्छा असते. एक जीव सांगतो आणि दुसरा मागतो, म्हणूनच डोहाळयांच्या बाबतीत भारतीय संस्कृतीने योग्य ती संवेदनशीलता आणि सुसंस्कारी दृष्टी दाखवली आहे. डोहाळयाच्या कार्यक्रमामध्ये गर्भवती मातेला आनंदी, प्रसन्न ठेवावे असा हेतू असतो. तसेच येणाऱ्या बालकांच्या इच्छा  त्याच्या आईमार्फत पूर्ण होun , माता आणि तिच्या पोटातले बाळ यामध्ये सुसंवाद साधला जातोयाचे प्राचीन धर्मशास्त्रील पुरावे - रामायणात कौशल्येला गरोदरपणी आपण धनुष्यबाण घेऊन युद्ध करावे, रानावनात जावे, राक्षसांचा उपद्रव दूर करावा असे डोहाळे लागायचे. पुढे होणाऱ्या पुत्राच्या वीरतेचेच हे निर्देशक होते आणि प्रत्यक्षात भगवंतांनी राक्षसांचा संहार करण्यासाठी जन्म घेतला. भगवान महावीरांना गर्भावस्थेत असतांनाच मति, श्रुती, अवघी ज्ञानाची प्राप्ती होती त्या गर्भाच्या संयोगाने त्रिशला मातेला जैन शास्त्रातील अवघड शब्दार्थ तत्त्वे तात्काळ उमगत होती, जी तिला गर्भावस्थेपूर्वी कठीण वाटायची, यासारखे अनेक उदाहरणे देता येतील.


एकदा आपल्या मनात जन्मपूर्व अवस्थेत शिक्षण ही कल्पना रुजली की पुढले काम सोपे आहे. ज्या मुलाला काही कळत नाही अशा मुलाला शाळेत घालून तरी काय उपयोग? आणि म्हणून गर्भावर संस्कार करण्यासाठी त्याला सर्व काही कळते आहे ही खात्री विश्वास आपण बाळगला पाहिजे.




Bumps, Backwaters & Bliss: The Surprising Pregnancy Secret No One Tells You (Before The 'No-Sleep Era' Begins)

  Before the "No-Sleep Era" officially kicks off, why not treat yourself and your bump to a pre-baby adventure in the incredible l...